श्रीधर बळवंत टिळक (सु. मार्च १, १८९६ - मे २५, १९२८) मराठी लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे धाकटे पुत्र होते. श्रीधरपंतांचा जन्म १८९६ साली झाला असावा, असे अनुमान केले जाते. आतापर्यंत त्यांची जन्मतारीख निश्चित स्वरूपात कळलेली नाही. १९२८ साली त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-खाली आत्महत्या केली. त्यांचे पुत्र जयंतराव टिळक (१९२१-२००१) पुढे केसरीचे संपादक आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापति झाले
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →श्रीधर बळवंत टिळक
या विषयातील रहस्ये उलगडा.