'शतक' ही कवी वसंत आबाजी डहाके यांची (विसावे शतक संपताना लिहिलेली कविता) 'चित्रलिपी' या कविता संग्रहात आहे. या कवितेत एकूण सात कडवी आहेत. 'कवीचे स्वगत आणि शतकाची अखेर' या समीक्षण लेखात कवितेचे समीक्षण करताना प्रा. देवानंद सोनटक्के म्हणतात 'शतक कविता वाचली की अंगावर काटा येतो. कारण एक क्षण, एक दिवस किंवा काही वर्षे – यांबद्दल कुणाची तक्रार असू शकते. पुन्हा सुखाचे दिवस येणारच असतात. तेवढ्यापुरती ती तक्रार असते. सामान्य माणूस तो क्षण जागून पुढे जात असतो. येथे `या शतकाची अखेर आता जवळ आली आहे ` ही पहिलीच ओळ वाचून वाचक हादरतो. मिलेनियम सेलिब्रेशन केलेल्या पिढीला तर ते खटकतेच. कवी इथे तत्त्ववेत्ता म्हणून बोलत आहे. कवीला अशी दार्शनिक विधाने करायला विश्वव्यापक अनुभूती पाहिजे. आपल्या निष्कर्षाबद्दल खात्री पाहिजे. मुख्य म्हणजे पुढेही तो त्या विधानावर ठाम राहिला पाहिजे.'
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शतक (कविता)
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.