शंकरराव चव्हाण

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

शंकरराव चव्हाण

डाॅ.शंकरराव भाऊराव चव्हाण(१९२०-२००४) हे महाराष्ट्राचे चाैथे मुख्यमंत्री आणि भारत सरकारचे केंद्रीय मंत्री होते. त्यांचा शेतकरी कुटुंबात औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथे जन्म झाला. प्राथमिक शिक्षण पैठण येथे घेऊन पुढे उस्मानिया (हैदराबाद) विद्यापीठातून ते बी.ए., एल् .एल्. बी. झाले.



१९४५ मध्ये त्यांनी वकिलीची सनद मिळवली, पण स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सल्ल्याने ते हैदराबाद मुक्तिसंग्रामात सहभागी झाले.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड हे गाव त्यांच्या कार्याचे केंद्र होते,

१७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थान भारतात सामील झाले अन् शंकररावांच्या कर्तृत्वाचे एक पर्व पूर्ण झाले.

१९४८-४९ मध्ये नांदेड जिल्हा काँग्रेसचे ते सरचिटणीस झाले. १९५२ च्या निवडणुकीत पराभव होऊनही ते खचले नाहीत. त्यांनी नांदेड नगरपालिकेत, सहकारी क्षेत्रात व कामगारवर्गात कार्य केले. नांदेडचे नगराध्यक्ष (१९५६), नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे अध्यक्ष आणि हैदराबाद राज्य सहकारी बँकेचे संचालक इ. विविध पदे त्यांनी भूषविली. १९५६ मध्ये मराठवाडा महाराष्ट्रात समाविष्ट झाला, त्यावेळी शंकररावांना मंत्रिमंडळात उपमंत्रिपद मिळाले. पुढे १९६० मध्ये पाटबंधारे व वीज खात्याचे ते मंत्री झाले आणि नंतर १९७२ पासून फेब्रुवारी १९७५ पर्यंत ते कृषिमंत्री होते. २१ फेब्रुवारी १९७५ रोजी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →