विद्या विंदू सिंग

या विषयातील रहस्ये उलगडा.

विद्या विंदू सिंग

विद्या विंदू सिंग (२ जुलै १९४५) या हिंदी आणि अवधी भाषांमधील भारतीय लेखिका आहेत. लोक आणि बालसाहित्यातील तिच्या व्यापक कार्यासाठी ती प्रसिद्ध आहे. सिंह यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने २०२२ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.

ती कविता, कथा आणि अवधी लोकगीते प्रकाशित करते. आतापर्यंत, तिने त्यापैकी शंभर अधिक पकाशित केले आहेत. या शिवाय, तिने अवधी आणि प्रदेशातील इतर प्रादेशिक बोलींमध्ये रक्षाबंधन सणासाठी दोन डझनहून अधिक लोकगीतेही रचली आहेत. साहित्यातील योगदानासोबतच ती तिच्या सामाजिक कार्यासाठीपण ओळखली जाते. 2016 मध्ये, तिला तिच्या योगदानासाठी हिंदी गौरव सन्मान पुरस्कार मिळाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →