विचारवेध साहित्य संमेलने ही विविध नावांनी भरतात.
आदिवासी विचारवेध संमेलन, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचारवेध साहित्य संमेलन, दलित साहित्य विचारवेध संमेलन, राजर्षी शाहू विचारवेध संमेलन, स्त्री-साहित्य विचारांचे संमेलन आणि नुसतेच विचारवेध संमेलन ही त्यांची काही नावे आहेत. ही संमेलने भरवणाऱ्या संस्थाही एकाहून अधिक आहेत. त्यामुळे एकाच क्रमांकाची दोन-तीन संमेलने असू शकतील. विचारवेध संमेलन २००७मध्ये काही करणा मुळे बंद झाले होते. २०१५ मध्ये ते पुन्हा काही कार्यकर्त्यांच्या मदतीने आणि इच्छेने सुरू झाले आहे. पुन्हा सुरू झालेल्या पुन्हा सुरू झालेल्या विचारवेध संमेलनाचा उद्देश जास्ती जास्ती तरुणांना पर्यंत पोहचणे आहे. त्यासाठी विचारवेधने युट्युब चानेल सुरू केले आहे. त्याच बरोबर विचारवेधची स्वतःची वेबसाईट देखील आहे. २० ते २२ जानेवारी २०१७ मध्ये पुण्यातील एस.एम,जोशी सभागृहात विचारवेध संमेलन पार पडले. नवीन विचारवेधने आणखी एक नवा पायंडा पाडला आहे. संमेलनाला अध्यक्ष न नेमण्याचा सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खाली प्रमाने आहे. त्याचा बरोबर पुरोगामी महाराष्ट्राला भारतातील इतर राज्यांशी जोडण्याचे काम विचारवेधच्या माध्यमातून व्हावे, म्हणून विचारवेध प्रयत्नशील आहे.
नवीन सुरू झालेल्या विचारवेधची भूमिका खालीलप्रमाणे आहे.
विचारवेध संमेलन
थोडक्यात पण महत्त्वाचे.