वसई हे भारतातील मुंबई शहराचे पालघर जिल्ह्यात असलेले एक उपनगर आहे. याला जवळचे रेल्वे स्थानक हे वसई रोड आहे. वसई शहर हे आधुनिक वसई-विरार महापालिकेत येते. रेल्वे स्थानक असलेल्या भागाचे नाव नवघर आहे.
वसई या शहरात पापडी, बाभोळा, देवतलाव, गिरिज, हिराडोंगरी, गास, भूईगाव, रानगाव, रमेदी, होळी अशी अनेक गावे येतात या शहराजवळ नायगाव आणि वसई ही दोन रेल्वे स्थानके आहेत. या शहरात हिंदू आणि ख्रिस्ती ह्या धर्मीय समाज हा अधिक आहे तसेच इतर धर्मीय देखील इथे बऱ्याच प्रमाणात आहेत. वसई हा तालुका देखील आहे. पूर्वी तो ठाणे जिल्ह्यात येत असे. आता तो पालघर जिल्ह्याचा भाग आहे. या तालुक्यात नायगाव, नालासोपारा, विरार, जुचंद्र आणि कामण रोड ही अन्य पाच रेल्वे स्थानकं देखील आहेत.
हे शहर मुंबईजवळचे शहर आहे. वसईची सुकेळी ही फार प्रसिद्ध होती. तशी ती आजही प्रसिद्ध आहेत पण कालांतराने या भागातील बागा कमी झाल्या आहेत.
पोर्तुगीजांनी येथे अरबी समुद्रालगत आरमारी किल्ला बांधला. सन १७३७ मध्ये थोरले बाजीराव पेशव्यांचे बंधू व सेनापती चिमाजी अप्पा यांनी वसई आणि साष्टी प्रांतावर केले व १७३९ मध्ये वसईचा किल्ला पोर्तुगीजांकडून जिंकून घेतला व मराठ्यांच्या राज्यास जोडला.
वसई
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!