राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता

या विषयावर तज्ञ बना.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता ही राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधील एक श्रेणी आहे. भारतातील माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेल्या डायरेक्टरेट ऑफ फिल्म फेस्टिव्हलद्वारे दरवर्षी हे पुरस्कार सादर करण्यात येतात. हा सहायक भूमिकेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या कलाकारास सादर केला जातो. हा एक रजत कमल पुरस्कार आहे. २०१७ला या पुरस्कारात रजत कमल, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे पारितोषिकात समाविष्ट होते. नवी दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची स्थापना १९५४ मध्ये "उच्च सौंदर्याचा आणि तांत्रिक मानक आणि शैक्षणिक आणि संस्कृती मूल्य असलेल्या चित्रपटांच्या निर्मितीस प्रोत्साहित करण्यासाठी" केली गेली आणि प्रादेशिक चित्रपटांसाठी पुरस्कारांचा समावेश करण्याचे नियोजनही केले. पुरस्कार "चित्रपटांसाठी राज्य पुरस्कार" म्हणून स्थापित करण्यात आले होते. परंतु १९५६ मध्ये १५व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये त्याचे "राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार" असे नामकरण करण्यात आले.

राज्य पुरस्काराने १९८४ मध्ये सहायक अभिनेताची श्रेणी सुरू केले गेली. जरी भारतीय चित्रपटसृष्टीने सुमारे २० भाषा आणि बोलीभाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती केली असली तरी हिंदी, मल्याळम, तामिळ, बंगाली, मराठी, कन्नड आणि तेलगू अशा सात प्रमुख भाषांमध्ये काम केलेल्या कलाकारांनी हे पारितोषिक मिळवले आहेत.

या पुरस्काराचे पहिले प्राप्तकर्ता व्हिक्टर बॅनर्जी होते, त्यांना घरे बइरे (१९८४) या बंगाली चित्रपटातील कामगिरीबद्दल ३२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१९ पुरस्कारांपर्यंत नाना पाटेकर, पंकज कपूर आणि अतुल कुलकर्णी या तीन कलाकारांना दोनदा गौरविण्यात आले आहे. पाटेकर यांना हिंदी चित्रपट परिंदा (१९८९) आणि अग्नि साक्षी (१९९६) साठी पुरस्काराने सन्मानित केले गेले. कपूर यांना राख (१९८८) आणि मकबूल (२००३) या हिंदी चित्रपटात काम केल्याबद्दल पुरस्कार मिळाला. कुलकर्णी यांना हे राम या १९९९ च्या तामिळ/हिंदी चित्रपटातील व चांदनी बार (२००१) या हिंदी चित्रपटातील कामगिरीबद्दल पुरस्कार देण्यात आला. परेश रावळ आणि दिलीप प्रभावळकर यांनी प्रत्येकी एका वर्षात दोन कामगिरीसाठी पुरस्कार जिंकला आहे. रावळ यांना ४१व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने वो छोकरी (१९९३) आणि सर (१९९३) या हिंदी चित्रपटांतील मुख्य भूमिकांकरिता पुरस्कार मिळाला, तर प्रभावलकरांना ५४व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने हिंदी चित्रपटात लगे रहो मुन्ना भाई (२००६) आणि शेवरी (२००६) हा मराठी चित्रपटतील अभिनयासाठी हा सन्मान जिंकला. ४२व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात हा पुरस्कार आशिष विद्यार्थी आणि नागेश यांच्यामध्ये अनुक्रमे हिंदी चित्रपट द्रोहकाल (१९९९) आणि तामिळ चित्रपट नाम्मवर (१९९९) या चित्रपटातील भूमिकांकरिता प्रदान केला गेला. सर्वात अलिकडील पुरस्कार प्राप्तकर्ता स्वानंद किरकिरे आहे, ज्यानी चुंबक (२०१८) या मराठी चित्रपटातील अभिनयासाठी ६६व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार मिळविला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →