रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी

या विषयातील रहस्ये उलगडा.

श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी (जम्म : रायतळे-पारनेर, १६ फेब्रुवारी १९३४; - इ.स. १९९९) हे साक्षात गुरुदेव दत्तात्रेयांचे अवतार आणि आद्य शंकराचार्यांच्या परंपरेत होऊन गेले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य ब्रह्मचर्याचे पालन करून वेदांच्या कार्यासाठी अर्थात वेदांचे महत्त्व पुनःप्रस्थापनेसाठी, धर्माविषयीची ओढ, आस्था सर्वांमध्ये पुन्हा जागॄत करण्यासाठी, वैदिक धर्म परम्परा, वैदिक मूर्ती पूजा अशा अतिशय महत्त्वाच्या, अवघड आणि कोणत्याही काळात गरज असलेल्या कार्यांवर सर्वांना अमूल्य मार्गदर्शन करण्यासाठी अर्पण केले.

त्यांचा अवतार मुख्यत्वे धर्म सांभाळणे, धर्म समजावून सांगणे आणि वेदान्त विचारावरच धर्माची स्थापना करणे ह्या कार्यासाठी झाला.

त्यांनी केलेली कार्ये सर्वांच्या आणि ह्या वसुन्धरेच्या कल्याणासाठीच होती. त्यांनी केलेल्या कार्यांपैकी काही कार्ये पुढे नमूद केलेली आहेत.



१) अनाथांना आधार देणे.(अनाथ म्हणजे ज्यांना धर्माचा योग्य मार्ग माहित नाही आणि ज्यांना योग्य मार्गदर्शनाची नितांत गरज आहे असे )

२) धर्म शिकवणे - अ) वेदांचा विस्तार करणे.:

ब) वेदांची महती सर्वांना समजावणे.:

क) वेद हे सर्व सामान्यांपर्यंत पोहोचवणे.

ड) वेद हे सर्वसामान्य जनांना समजावणे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →