विरांगना महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, ज्यांना झांशीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते, (नोव्हेंबर १९, १८३५ - जून १७, १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झांशी राज्याच्या राणी होत्या. इ.स. १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढणाऱ्या त्या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्यामुळे आणि नेतृत्वामुळे त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून भारतीय जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राणी लक्ष्मीबाई
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?