राजेंद्र श्रीनिवास बनहट्टी (१४ जानेवारी, १९३८:नागपूर, महाराष्ट्र) हे एक मराठी कथाकार, कादंबरीकार आणि प्रवासवर्णने लिहिणारे लेखक आहेत. साहित्य-समानधर्मा (१९७१) हा त्यांचा पहिला कथासंग्रह होय. लेखक श्री.ना. बनहट्टी हे त्यांचे वडील होय. राजेंद्र बनहट्टी हे इंग्रजी भाषा आणि मानसशास्त्र या दोनही विषयांचे एम.ए. आहेत. पुण्यात त्यांची एक प्रकाशनसंस्था आहे.
बनहट्टी यांचा जन्म नागपूरला झाला, नंतर ते पुण्यात स्थायिक झाले. त्यांच्या बालपणीचे नागपूरचे घर, त्या घरातील सर्वांसोबतच्या आठवणी, काही प्रसंग या सर्वांचे चित्रण बनहट्टी यांनी ‘गोष्टी घराकडील’ या पुस्तकात केले आहे. राजेंद्र बनहट्टी यांच्या गंगार्पण, कृष्णजन्म, लांडगा यांना महाराष्ट्र सरकारचे सर्वोत्कृष्ट कथासंग्रहाचे पुरस्कार मिळाले आहेत.
राजेंद्र बनहट्टी
थोडक्यात पण महत्त्वाचे.