मृत्युपत्रात वारसा हक्कांचे नियोजन केले जाते. यास इच्छापत्र असेही म्हणतात. मृत्युपश्चात मयत व्यक्तीच्या इच्छेनुसार मालमत्तेचा विनियोग करणे हे प्रमुख कार्य या दस्तऐवजांचे असते. मृत्युपत्र नमूद करून ठेवले असले तर वारसांना त्यानुसार विनियोग करणे बंधनकारक होते. आपले मालमत्ता विषयक विचार पक्के असतील तर ते इच्छापत्राद्वारे लिहून काढणे गरजेचे आहे. जिचे मानसिक संतुलन व्यवस्थित आहे अशी कोणीही सज्ञान व्यक्ती तिच्या स्वतःच्या मालमत्तेसंबंधी मृत्युपत्र करू शकते. मृत्युपत्रात नमूद केलेली व्यक्ती वारस असेल तरच ती व्यक्ती मिळकतीची लाभधारक होते. इतर सर्व बाबतीत मृत्युपत्रातील व्यक्तीलाच त्या मालमत्तेची मालकी मिळते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →मृत्युपत्र
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.