मराठी बौद्ध साहित्य

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

बौद्ध साहित्य म्हणजे बौद्ध धर्मासंबंधी साहित्य. बुद्धधर्मीयांनी लिहिलेले साहित्य नव्हे. लेखात अशा कुठल्याच साहित्याचा नामनिर्देश नाही.

बौद्ध साहित्य प्रसार संस्था या संस्थेची स्थापना केवळ बौद्ध म्हणुन बौद्धांच्या अस्मिता जागृत करण्याच्या दृष्टिने करण्यात आली.आजपर्यंत दलित म्हणुन अनेक साहित्य संमेलने झाली परंतु ती केवळ मोजक्याच प्रतिक्रिया देऊन गेली.अन बौद्धांच्या अस्मितेशी आजमितीस असणारा प्रश्न आहे तो पुन्हा जसाचा तसाच उपेक्षीत राहत गेला. दलित,दलित म्हणुन दलित विभागला गेला त्यामुळे दलित म्हणुन कोणीही अत्याचार करावेत अन् दलितांनी रस्त्यावर उतरावे येथपर्यंतच आपली मजल राहिली परंतु प्रतिबंधात्मक उपायोजनाना साहित्यातुन आली ना,राज्यकर्त्यांतून आली.ख-या अर्थाने या 85 टक्के दलितांच्या मतावर सरकार स्थापले जाते अन् त्यातुन दलित हा वंचितच हेतुपुरस्पर राखण्यात प्रस्थापीतांनी यश मिळविले हे सोडवण्यासाठी अजुनही आपले डोळे उघडतच नाहीत हिच मोठी शोकांतीका या संस्थेच्या स्थापने पर्यंत चालुच होती.बौद्ध साहित्य म्हणजे नेमके काय हे दलित साहित्याहुन वेगळे आहे का ? असे प्रश्न जेव्हा उपस्थित होतात तेव्हा काय मांडणी करावी हा विचार येऊन न्याय,स्वातंत्र्य,मैत्रबंधुभाव जसेच्या तसे ठेवुन समता टिकवावी का ? स्वतंत्र अस्तित्त्व निर्माण करावे असेही प्रश्न पुन्हा उभे राहिल्याने.आजचा हा जातीपातीत विभागलेला समाज तथागतांच्या काळात सागरासारखा एकसंघ होता.तसेच तथागतांच्या काळात पाली हीच बोली भाषा होती.पाली भाषा ही सम्राट अशोक यांच्या कालखंडापर्यंत होती. सम्राट अशोकाचे साम्राज्य भारतात खूप दूरवर होते. सम्राट अशोकाच्या नंतर काळाच्या ओघात अन् कलपरिवर्तनात पालीभाषा लुप्त झाली अन् आज जी बोली भाषा बोलली जाते ती मराठी तेव्हा मराठी या भाषेतून बौद्ध साहित्य असावे या उद्देशाने प्रेरित होऊन बौद्ध साहित्य निर्मितीस चालना मिळाली.तसेच दलित न म्हणता बौद्ध म्हणुन,बहुजन समाजमनाचा आरसा म्हणुन प्रतिबिंबीत होणारे मराठी भाषेत बौद्ध साहित्य असावे याच उद्देशाने संपूर्ण भारतातुन पहिलीच एक बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे रजिस्ट्रेशन करण्यात आले.बौद्ध साहित्य प्रसार संस्थेचे रजिस्ट्रेशन क्रमांक महा./1510/18/ठाणे व ट्रस्टचा रजि.क्रमांक एफ – 39323 असा असून नीती आयोगाकडील युनिक आयडी क्रमांक MH/2018/0214195 असा आहे यातच आपल्या सर्व भारतीय बौद्ध बांधवांची बौद्ध म्हणुन अस्मिता आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →