भारतीय क्रिकेट संघाने नोव्हेंबर १९९९ ते जानेवारी २००० दरम्यान ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. ह्या दौऱ्यामध्ये भारत ४-सराव सामने खेळला आणि उभय संघांमध्ये ३-कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावस्कर चषक मालिका पार पडली. ह्या मालिकेसह ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदाच बॉर्डर-गावस्कर चषक जिंकला.
याशिवाय भारतीय संघ, यजमान ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान सोबत कार्लटन आणि युनायटेड मालिका ह्या त्रिकोणी मालिकेमध्ये सहभागी झाला होता.
भारतीय क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९९-२०००
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.