भारतीय उपराष्ट्रपतीपदा साठी ६ ऑगस्ट २०२२ रोजी निवडणूक झाली. भारतीय निवडणूक आयोगाने ही घोषणा केली आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ५६(१) मध्ये अशी तरतूद आहे की भारताचे उपराष्ट्रपती पाच वर्षांच्या कालावधीसाठी पदावर राहतील आणि ६ ऑगस्ट २०२२ रोजी त्यांची नियुक्त झालि. या निवडणुकीतील विजेता विद्यमान उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांची जागा घेईल. १६ जुलै २०२२ रोजी, पश्चिम बंगालचे तत्कालीन राज्यपाल जगदीप धनखर यांना भाजपने उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून नामांकन दिले होते. १७ जुलै २०२२ रोजी, मार्गारेट अल्वा यांना यूपीएने विरोधी पक्षांचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →भारतीय उपराष्ट्रपती निवडणूक, २०२२
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?