भारतामधील बौद्ध धर्म

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

भारतामधील बौद्ध धर्म

बौद्ध धर्म हा एक जागतिक धर्म आहे, जो मगधच्या प्राचीन साम्राज्याच्या (आताचे बिहार, भारत) सभोवती उभा आहे आणि सिद्धार्थ गौतम, "बुद्ध" ("जागृत व्यक्ती") यांच्या शिकवणींवर आधारित आहे. बुद्धांच्या जीवनकाळात सुरू हा बौद्ध धर्म मगधाबाहेर पसरला.

बौद्ध मौर्य सम्राट अशोकांच्या साम्राज्याच्या काळात बौद्ध समाज दोन शाखांमध्ये विभागला गेला: महासंघिका आणि स्थवीरवाद, हे दोन्ही बौद्ध समाज भारतभर पसरले आणि अनेक उप-संप्रदायात विभागले गेले. आधुनिक काळामध्ये बौद्ध धर्माच्या दोन प्रमुख शाखा अस्तित्वात आहेत: श्रीलंका आणि दक्षिणपूर्व आशियातील थेरवाद आणि हिमालयीन आणि पूर्व आशियातील महायान.

प्राचीन भारतात सम्राट अशोक नंतर पुढे, बौद्ध धर्म आणि बौद्ध मठांच्या प्रथांना १२ व्या शतकादरम्यान सामान्य लोक आणि राजेशाही यांचा पाठिंबा प्राप्त झाला होता परंतु सामान्यतः इ.स. १ सहस्र वर्षामध्ये यात घट झाली होती, ज्यात त्यांच्या अनेक पद्धती आणि विचार हिंदू धर्मातील होत्या. १२ व्या शतकाच्या उत्तरार्धात इस्लामचे आगमन झाल्यानंतर हिमालयीन भाग आणि दक्षिण भारताव्यतिरिक्त बौद्ध धर्म भारतात जवळजवळ विलुप्त झाला.



हिमालयाच्या परिसरातील सिक्कीम, लडाख, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग पर्वतरांग आणि उच्च हिमाचल प्रदेशमधील लाहौल आणि स्पीति भागात बौद्ध धर्म हा मुख्य किंवा मोठा धर्म आहे. याव्यतिरिक्त बौद्ध अवशेष आंध्रप्रदेशात आढळतात, जे महायान बौद्ध धर्माचे मूळ आहे. गेल्या शंभर वर्षांपासून बौद्ध धर्माची भारतामध्ये पुनर्निर्मिती होत आहे, कारण बऱ्याच भारतीय बुद्धिमतांनी बौद्ध, तिबेटी निर्वासित लोकांचे स्थलांतर केले आणि लक्षावधी हिंदू दलितांनी बौद्ध धर्मात धर्मांतर केले. २०११ च्या जनगणनेनुसार, भारताच्या लोकसंख्येमध्ये ०.७% किंवा ८५ लाख बौद्ध व्यक्ती आहेत. इतर अहवालानुसार भारतीय लोकसंख्येत ५% ते ६% (६ ते ७ कोटी) बौद्ध आहे तर प्रसिद्ध भारतीय बौद्ध नेते व भिक्खु भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या मते, भारतात १० कोटी बौद्ध अनुयायी आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →