भारतातील मधुमेह समस्या

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

भारतातील मधुमेह समस्या

भारतात अंदाजे 21.2 कोटी लोकांना मधुमेह आहे, तर जगभरात ही संख्या सुमारे 82.8 कोटी आहे. जगातील प्रत्येक चार मधुमेहींपैकी एक (26%) व्यक्ती भारतातील आहे, त्यामुळे मधुमेहाने सर्वाधिक प्रभावित देशांमध्ये भारताचा समावेश होतो. (नोव्हेंबर 2024 मध्ये भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या सुमारे 17.78% इतकी होती.)

भारतात मधुमेह टाईप वन पाश्चिमात्य देशांच्या तुलनेत कमी प्रमाणात आढळतो, आणि निदान झालेल्या भारतीयांपैकी सुमारे 90 ते 95% लोकांना मधुमेह टाईप टू आढळतो. आंतरराष्ट्रीय स्तरावर उच्च बीएमआय हा टाईप २ मधुमेहासाठी एक धोकादायक घटक मानला जातो, परंतु भारतातील प्रकार 2 मधुमेह असलेल्या लोकांपैकी केवळ सुमारे एक-तृतीयांश लोकांचा शरीर वस्तुमान निर्देशांक (BMI) 25 पेक्षा जास्त आढळूण येतो.२०२१ मधील दीर्घकालीन गटांमधील संभाव्य माहितीच्या एका अभ्यासात असे आढळले की, दक्षिण आशियायी प्रौढांमध्ये मधुमेहाचे प्रमाण अमेरिकन श्वेतवर्णीयांपेक्षा जास्त आहे, आणि लठ्ठपणा नसलेल्या लोकांमध्येसुद्धा ते लक्षणीयरीत्या जास्त आहे. या निष्कर्षांवरून असेही दिसून येते की, दक्षिण आशियाई लोकांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधकता अमेरिकन कृष्णवर्णीय किंवा श्वेतवर्णीयांपेक्षा कमी आहे. त्यामुळे, दक्षिण आशियाई लोकांमध्ये मधुमेहाच्या धोक्यासाठी लठ्ठपणा आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेव्यतिरिक्त इतर घटक (उदा. जन्मजात इन्सुलिनची कमतरता) महत्त्वाचे असू शकतात. या अभ्यासाच्या लेखकांनी दक्षिण आशियाई लोकांमध्ये, आजाराच्या धोक्याच्या यंत्रणांना हाताळण्यासाठी तपासणी, प्रतिबंध आणि उपचारांसाठीच्या प्रमाणित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याची शिफारस केली आहे. 2004 मधील एका अभ्यासानुसार औद्योगिकीकरण आणि ग्रामीण भागातून शहरी भागात स्थलांतर यांमुळे जीवनशैलीत झालेल्या बदलांमुळे भारतीयांमध्ये प्रकार 2 मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे.

या जीवनशैलीतील बदलांमुळे आशियाई लोकसंख्येमध्ये प्राणिजन्य अन्नातून मिळणाऱ्या उर्जेचे प्रमाण वाढले आहे. भारतात शहरी भागातील लोक त्यांच्या उर्जेच्या सुमारे 32% भाग प्राणिजन्य चरबीपासून घेतात, तर ग्रामीण भागात हे प्रमाण 17% आहे. हे बदल आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच दिसून येतात, त्यामुळे दीर्घकालीन दीर्घकालीन गुंतागुंत अधिक प्रमाणात आढळते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →