२०१६मध्ये भारत सरकारने १,००० व ५०० रुपयांच्या चलनी नोटांचे विमुद्रीकरण केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची घोषणा केली. त्या योजनेनुसार:
दि. ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून (००.००तास) भारतातील सर्व बँकांचे एटीएम बंद राहतील. ते दि. ९ व १० नोव्हेंबरलादेखील बंद असतील.
भारतातील सर्व बँका दि.९ नोव्हेंबर २०१६ला बंद राहतील.
दि. ८ नोव्हेंबर २०१६ च्या मध्यरात्रीपासून सध्या भारताच्या चलनात असलेल्या रु. ५०० व १००० च्या सर्व नोटा व्यवहारासाठी बंद करण्यात आल्या आहेत.
लवकरच रु.५०० च्या व २००० च्या नवीन नोटा भारताच्या चलनात व व्यवहारात येतील. या नोटा विशेष प्रकारच्या असतील.
कोणीही नागरिक त्याचेजवळ असलेल्या जुन्या ५०० व १००० च्या नोटा दि. १० नोव्हेंबर २०१६ ते ३० डिसेंबर २०१६ या कालावधीत कोणत्याही बँकेत अथवा पोस्ट ऑफिसमध्ये भरू शकेल, व त्याऐवजी पर्यायी चलन प्राप्त करू शकेल.
त्यानंतर या नोटा दि. ३१ मार्च २०१७ पर्यंत एक प्रतिज्ञापत्र भरून रिझर्व बँकेत जमा करता येतील.
सीएनजी गॅस, पेट्रोल पंप, हॉस्पिटल आणि घाऊक बाजारात ११ नोव्हेंबर २०१६पर्यंत जुन्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील.
नोटा बँकेत अथवा पोस्टात बदलण्यासाठी/जमा करण्यासाठी आधार कार्ड/पॅन कार्ड आवश्यक करण्यात आलेले आहे.
याद्वारे खोट्या चलनालापण रोध बसणार आहे.
काळ्या पैशावर, भ्रष्टाचारावर तसेच मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बनावट नोटांच्या परिचलनावर याद्वारे आळा बसू शकेल. त्यासोबतच, हत्यारांच्या स्मगलिंकरिताच्या निधीवर, हेरगिरीवर आणि दहशतवादावरही नियंत्रण येईल असा भारत सरकारचा दावा आहे.
यामुळे भारतातील अनेकांना आपली बेहिशेबी संपत्ती नाईलाजाने बँकेत जमा करावी लागली. त्यांची मोठीच पंचाईत झाली.
भारताच्या चलनाचे विमुद्रीकरण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?