बाल साहित्य संमेलन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्थेने आयोजित केलेले जगातील पहिले बाल साहित्यिकांचे संमेलन ठाण्यातील एन. के.टी. सभागृहात घेण्यात १५ नोव्हेंबर २००९ रोजी झाले.. शेकडो मुलांनी, बाल साहित्यिकांनी आणि पालकांनी संपूर्ण सभागृह खच्चून भरून गेले होते. या प्रंचड गर्दीतील बालक व पालकांच्या व्यवस्थेसाठी चित्रवाणीच्या पडद्यांवरही हा कार्यक्रम दाखवण्यात आला.

या संमेलनाची बाल संमेलनाध्यक्ष पुण्याची ११ वर्षे वयाची कु. राधिका लाड होती.



मराठी ग्रंथसंग्रहालय, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ, साने गुरुजी वाचनालय आणि न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे तेथील गडकरी रंगायतन येथे २रे बाल साहित्य संमेलन २४ डिसेंबर २०१० रोजी झाले.

देवरुख येथील साडवली गावातील मीनाताई ठाकरे विद्यालयात येथे इयत्ता नववीत शिकणारी कु. दक्षता लिंगायत ही संमेलनाध्यक्ष होती.



३ऱ्या एक दिवसीय बालसाहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमात मुलांनी आपले कलागुण दाखविले. डोंबिवलीत २७ नोव्हेंबर २०११ रोजी झालेल्या या संमेलनात बच्चे कंपनीने या उपक्रमाचा मनमुराद आनंद लुटला.

संमेलनाध्यक्षा दहावीच्या वर्गातली मोहने गावची कु. स्वरूपा सुरोषे होती.



४थे बालसाहित्य संमेलन ठाण्यात ९ फेब्रुवारी २०१३ रोजी झाले.

शिराळा गावची कु. अंजली लोहार ही संमेलनाची स्वागताध्यक्षा होती. तर संमेलनाध्यक्ष म्हणून वैभवी धोपाटे होती.



५ वे राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन पुण्यात नोव्हेंबर २०१३ मध्ये होणार आहे.

मुलुंड तालुकास्तरीय आंतरशालेय बाल साहित्य संमेलन मुलुंड येथे ६ ऑक्टोबर २०१३ रोजी झाले. नितिश यादव हा विद्यार्थी संमेलनाध्यक्ष होता.

जिल्हास्तरीय बाल साहित्य संमेलन ठाणे येथे सप्टेंबर २०१३ मध्ये होणार आहे.

ठाण्याच्या कासारवडवली येथील आदर्श विद्यामंदिर येथे २१ नोव्हेंबर २०१४ रोजी एक बालसाहित्य संमेलन जल्लोषात साजरे झाले. या संमेलनाच्या अध्यक्षस्थपद भूषवण्याचा मान पनवेलजवळील लोधिवली येथील ज. हि. अंबानी शाळेतील उत्कर्षा वझरेकर हिला मिळाला होता.

१२ नोव्हेंबर २०११ रोजी बेळगावमध्ये एक बाल साहित्य संमेलन झाले होते. राणी चेन्नम्मा विश्वविद्यालयातील मराठीचे विभागप्रमुख प्रा डॉ. विनोद गायकवाड हे संमेलनाध्यक्ष होते. हे संमेलन वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित झाले होते.

बालसाहित्य संमेलन, नागपूर. हे मुलांनी मुलांसाठी भरवलेले संमेलन होते.

विदर्भ साहित्य संघाचे बालसाहित्य संमेलन, बुलढाणा येथे झाले होते.

विदर्भ साहित्य संघ आणि स्त्रीशिक्षण प्रसारक मंडळ यांनी आयोजित केलेले राज्यस्तरीय बाल साहित्य संमेलन २३-२४ डिसेंबर २०१३ या दिवसांत नागपूरला होणार आहे. अध्यक्षस्थानी डॉ. विजया वाड असतील.

रतन टाटा ट्रस्टचे बालविविधा संमेलन, नागपूर.

नागपूरमधील राजाराम सीताराम दीक्षित वाचनालयाने २००१ साली एक बाल साहित्य संमेलन भरवले होते. अध्यक्षस्थानी [[डाॅ. शुभा साठे होत्या.

यांशिवाय अकोला (विदर्भ साहित्य संघाचे पाचवे बाल-कुमार साहित्य संमेलन अकोला येथे १ व २ डिसेंबर २०१७ रोजी, अध्यक्ष शंकर कऱ्हाडे), नाशिक (१६-१७ सप्टेंबर २०१७, उद्घाटन वीणा गवाणकर यांच्या हस्ते), बेळगाव (१८वे, १७ नोव्हेंबर २०१८), पातूर-अकोला जिल्हा (२८ फेब्रुवारी २०१९, अध्यक्षस्थानी विद्यार्थिनी खुशी राठोड) येथेही बाल साहित्य संमेलने झाली.

गडचिरोली येथे ३१-१-२०१२ रोजी एक बाल साहित्य संमेलन झाले होते. त्याचे संमेलनाध्यक्ष हरीष बल्की हे होते.



अधिक माहिती न्यायिक लढा पत्रकार सेवा संस्था Abhijeet Tupdale 9892325453 या क्रमांकावर उपलब्ध आहे.



पहा : मराठी साहित्य संमेलने बालकुमार साहित्य संमेलन

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →