पवनीचा किल्ला

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

पवनीचा किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हा किल्ला भंडारा जिल्ह्यातील पवनी येथे स्थित आहे. तो भंडारा शहरापासून ४७ आणि नागपूरपासून ८२ किलोमीटर अंतरावर आहे. पवनी गावाच्या तीन बाजूनी टेकड्या आणि एका बाजूने वैनगंगा नदी वाहते. त्यांपैकी एका टेकडीवर पवन राजाचा हा किल्ला आहे.

पवनी शहरात जाणारा मुख्य रस्ता ह्या किल्ल्याच्या दरवाजातूनच जातो. हा किल्ला अजूनही बराच सुस्थितीत आहे. पवनीच्या किल्ल्याची एक भिंत आणि तिच्या पायथ्याशी असलेला तलाव शहरात प्रवेश करतानाच लक्ष वेधून घेतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →