पत्री

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

मंगळागौर, हरतालिका आदी देवींच्या पूजेच्या वेळी त्यांना पत्री म्हणजे झाडांची पाने वाहण्याची प्रथा हिंदू धर्मात आहे. गणेश पूजनादरम्यानसुद्धा अशाच प्रकारे २१ प्रकारच्या पत्री वाहतात. या प्रथेमागे पूर्वजांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मानवाच्या सभोवताली असणाऱ्या निसर्गामधील अनमोल औषधी-खजिन्याचे ज्ञान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा शास्त्रीय हेतू डोळ्यांसमोर ठेवूनच गणेशचतुर्थीसारख्या सर्वप्रिय सणावेळी पत्री वाहण्याची प्रथा पूर्वजांनी सुरू केली आहे. हजारो वर्षांच्या निरीक्षण व संशोधनानंतर मिळालेले औषधी-ज्ञान वेगवेगळ्या आजारांचा सामना करण्यासाठी पुढील पिढ्यांनाही विनासायास मिळावे हा महत्त्वाचा हेतू या पत्री वाहाण्यामागे आहे, हे उघड आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →