मुंबईतील घाटकोपर (पूर्व) येथे रशियन कामगार वसाहतीच्या धर्तीवर म्हाडाने (तेव्हाचे हाउसिंग बोर्ड) १९६० च्या दशकात पंतनगर नावाची वसाहत उभारली. भारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांच्या नावावरून या वसाहतीचे नाव ठेवण्यात आले आहे. कामगारांसाठी ही वसाहत असल्याने येथे गिरणी, खाण आणि गोदी यांमधील कामगारांची संख्या मोठी होती. पंतनगरमध्ये एक मोठी पोलीस वसाहतदेखील आहे. कामगार नेते कै.डॉ. दत्ता सामंत याचे घर आणि दवाखाना या वसाहतीत होता. दवाखान्यात येणाऱ्या कामगाराच्या समस्या जाणून घेता-घेता त्यांनी कामगार चळवळ उभारली. यामुळे पंतनगरमध्ये अनेक कामगार चळवळींचे रणशिंग फुंकले गेले. पुढे मुंबईतील खाणी बंद झाल्या आणि खाण कामगारही कमी झाले. गिरण्यांच्या ऐतिहासिक संपानंतर गिरणीकामगारही पंतनगरमधून बाहेर पडले. सुरुवातील मराठी लोकांखालोखाल दाक्षिणात्यांची लोकसंख्या होती. मात्र कामगार संपल्यावर येथील मराठी लोकसंख्या कमी होऊन गुजराती लोकसंख्या वाढली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →पंतनगर
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.