बाबासाहेब घोरपडे ऊर्फ नारायणराव घोरपडे (इ.स. १८७०:करकंब, महाराष्ट्र - इ.स. १९४३) याचे पाळण्यातले नाव गोपाळ जोशी करकंबकर होत. इचलकरंजीचे तत्कालीन संस्थानिक गोविंदराव ऊर्फ आबासाहेब घोरपडे हे निपुत्रिक होते. त्यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी पद्मावती बाई यांनी संस्थानाच्या गादीला वारसा म्हणून पंधरा मुलांमधून देखण्या व चुणचुणीत गोपाळ जोशीची निवड केली आणि त्याला १० ऑगस्ट १८७६ रोजी दत्तक घेतले आणि गोपाळ जोशी हे नारायणराव (बाबासाहेब) घोरपडे झाले व पुढील काळात इचलकरंजीचे संस्थानिक झाले.
घोरपडे घराण्याच्या परंपरेनुसार बाबासाहेब घोरपडे यांनी रीतसर शिक्षण घेतले. आधी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजात व नंतर मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजातून त्यांनी इंग्रजी, इतिहास व अर्थशास्त्र हे विषय घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले. लहान वयांतच त्यांनी पौराणिक आणि ऐतिहासिक ग्रंथांच्या वाचनाची आवड होती. कॉलेजात गेल्यानंतर त्यांचे वाचन अधिक प्रगल्भ झाले. तसेच पुढे त्यांनी एल.एल.बी.ची पदवी घेतली. शिक्षण पूर्ण झाल्यावर १८ जून १८९२ रोजी त्यांना संस्थानाची मुखत्यारी देण्यात आली.
विद्यार्थिदशेत असताना बाबासाहेब घोरपड्यांना न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या विचारांचे आकर्षण वाटू लागले होते. लोकमान्य टिळकांचाही त्यांच्यावर प्रभाव होता. इचलकरंजीच्या संस्थानिकपदाची सूत्रे हाती पडल्यावर त्यांनी आपल्या प्रजाजनांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सार्वजनिक उन्नतीकडे लक्ष दिले.
नारायणराव घोरपडे
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.