दशमान पद्धत

यामागील विज्ञान आणि इतिहास.

अतिप्राचीन भारतामधे गणित शास्त्रावर बरेच संशोधन झाले आहे. त्यावेळापासून भारतीयांनी गणितासाठी वापरलेल्या चिन्हांना अंक असे म्हणले जाते. हेच अंक (१, २, ३, ४, ५, ६, ७, ८, ९, ०) सध्याच्या दशमान पद्धतीचे जनक आहेत. यातील दहाव्या चिन्हाच्या(अंक-०) शोधामुळे आपल्या दशमान पद्धतीला सुरुवात झाली.

या दहाव्या अंकास संस्कृत भाषेत शून्य हे नाव आहे. "ख", "गगन", "आकाश", "नभ", "अनंत", "रिक्त", "पुज्य" अशी अनेक नावे त्यावेळी वापरली जात असत. आता ही शिक्षक अंक शिकवताना 'एकावर पुज्य दहा, दोनवर पुज्य वीस' अशी उजळणी घेतात. या (शून्य) अंकाची गरज असल्याचे प्रथम भारतीय गणितज्ञांना जाणवले.

आसा ह्या वैदिक काळाच्या आरंभी होऊन गेलेल्या वायव्य भारतात राहाणाऱ्या भारतीय गणितज्ञांनी जगात सर्वप्रथम दशमान पद्धतीची संकल्पना मांडली. अंकांच्या स्थानानुसार त्याची किंमत बदलेल या आसा यांनी मांडलेल्या संकल्पनेतून जगाला अंकलेखनाच्या दशमान पद्धतीची देणगी मिळाली. अशा रितीने लिहिलेले आकडे हिंदासा (हिंद देशातील आसा) या नावाने ओळखले जाऊ लागले. आसांच्या या शोधामुळे गणिताची प्रगती वेगाने होण्याला हातभार लागला.

ऋग्वेदात दशमान पद्धतीचा वापर अनेक ऋचांमध्ये आहे. त्यामुळे ऋग्वेद काळा आधीपासून ही पद्धती रूढ होती हे दिसते.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →