डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार हा भारताच्या केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानाच्यावतीने प्रदान केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्म शताब्दी वर्ष १९९२ मध्ये गठीत समितीद्वारे ‘डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तेव्हापासून या पुरस्काराचे वितरण केले जाते. भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जातो.
पुरस्कारासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष भारताचे उपराष्ट्रपती असतात. यासोबत भारताचे मुख्य न्यायाधीश, पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, यासह दोन असे व्यक्ती ज्यांचे सार्वजनिक जीवनात मोठे योगदान आहे, अशा व्यक्तींची समिती नेमली जाते.
हा पुरस्कार इ.स. १९९३, १९९४, १९९६ व १९९८ मध्ये प्रदान केला गेला, त्यानंतर २० वर्षांनी इ.स. २०११, २०१२ व २०१४चे पुरस्कार २६ मे इ.स. २०१७ रोजी एकत्रित प्रदान करण्यात आले.
डॉ. आंबेडकर राष्ट्रीय पुरस्कार
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.