शा.श. १२१२, अर्थात इ.स. १२९०, साली प्रवरातीरी असणाऱ्या नेवासे या गावातील मंदिरात एक खांबाला टेकून भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हणले जाते. ज्ञानेश्वरीत एकूण १८ अध्याय आहेत.
सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. मराठीतील गोडवा अन्य भाषिकांना कळावा या उद्देशाने संस्कृत(गीर्वाण), हिंदी भाषा, कन्नड, तमिळ, इंग्रजीबरोबरच २१ निरनिराळ्या भाषांमध्ये ज्ञानेश्वरी भाषांतरित झाली असून ते भाषांतरित छापील ग्रंथ उपलब्ध आहेत.
'ज्ञानेश्वरी' लिहून घेणारे लेखक - सच्चिदानंद बाबा
'ज्ञानेश्वरी'चे पहिले भाष्यकार - संत निवृत्तीनाथ महाराज.
'ज्ञानेश्वरी'चे पहिले संशोधक - संत एकनाथ.
'ज्ञानेश्वरी'चा पहिला संकलनकार - संत महिपती.
'ज्ञानेश्वरी'चे पहिले प्रसारक - संत नामदेव.
ज्ञानेश्वरी
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.