जोगेंद्रनाथ मंडल (२९ जानेवारी, १९०४ - ५ ऑक्टोबर, १९६८) हे आधुनिक पाकिस्तान राष्ट्राच्या केंद्रीय व अग्रणी संस्थापकांपैकी एक होते, तसेच ते पाकिस्तानचे पहिले कायदे व कामगार मंत्री आणि राष्ट्रकुल व काश्मीर प्रकरणाचे दुसरे मंत्रीही होते. एक भारतीय आणि नंतर पाकिस्तानी राजकारणी म्हणून त्यांनी पाकिस्तानमध्ये कायदा आणि कामगारांचे पहिले मंत्री म्हणून काम पाहिले. ते बंगाल प्रांतातील अनुसूचित जातीचे (दलित) नेते होते. बाबासाहेब आंबेडकर यांना बंगाल प्रातांतून संविधान सभेवर निवडून देण्यात त्यांनी सहकार्य केले होते. मोहम्मद अली जिना यांच्या निधनानंतर त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला व ते भारतात परतले. जोगेंद्र मण्डल हे त्यांच्या सोबत ७ लाख दलिताना घेऊन पूर्व पाकिस्तानात भाईचारा पाळायला घेऊन गेले. बालिकेपासून ४० वर्षीय हिंदू दलित स्त्रीवर काफिर म्हणून, बलात्कारित केले गेले. ह्या बाबत जोगेंद्र मंडळ स्वतः बोलले होते. शेवटी ७ लाख हिंदू दलिताना तेथेच त्यांच्या नशिबावर सोडून पाकिस्तानचा हा पहिला कायदेमंत्री भारतात परतला. भारताने हिंदू म्हणून त्याला राजाश्रय दिला. पाकिस्तानात हिंदू विरोधी, ब्राह्मण विरोधी असूनही काहीही फायदा झाला नाही. मंडळ यांच्या सोबतचे अनेक हिंदू दलित बलात्कारीत झाले. असंख्य दलितांचा धर्म बळजबरीने बदलला गेला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →जोगेंद्रनाथ मंडल
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.