जसपिंदर नरुला

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

जसपिंदर नरुला

जसपिंदर नरुला (१४ नोव्हेंबर, १९७० - ) ही भारतीय पार्श्वगायिका, शास्त्रीय आणि सुफी संगीताची गायिका आहे. तिने हिंदी आणि पंजाबी सिनेमांमध्येही पार्श्वगायन केले आहे. १९९८ च्या प्यार तो होना ही था या चित्रपटातील रेमो फर्नांडिस सोबतच्या "प्यार तो होना ही था" या युगलगीतानंतर तिला प्रसिद्धी मिळाली. या गाण्यासाठी तिला १९९९ चा सर्वोत्कृष्ट महिला पार्श्वगायकाचा फिल्मफेअर पुरस्कार व स्क्रीन पुरस्कार मिळाला. मिशन कश्मीर (२०००), मोहब्बतें (२०००), फिर भी दिल है हिंदुस्तानी (२०००) आणि बंटी और बबली (२००५) हे तिने गायलेले इतर उल्लेखनीय चित्रपट आहेत. ती सुफी संगीत, तसेच गुरबानी आणि इतर शीख धार्मिक संगीताची गायिका आहे. २००८ मध्ये, तिने NDTV इमॅजिन सिंगिंग रिॲलिटी मालिका, धूम मचा दे मध्ये भारताच्या सर्वोत्कृष्ट लाइव्ह परफॉर्मरचा किताब जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →