चाणक्य

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

चाणक्य (इतर नावे: विष्णूगुप्त, कौटिल्य) (कालमान: अनुमाने इ.स.पू. ३५०च्या सुमारास) हा सम्राट चंद्रगुप्त मौर्याच्या राजसभेत महामंत्री होता. अत्याचारी नंद घराणेशाहीची राजवट संपवून सम्राट चंद्रगुप्ताला सिंहासनावर बसवण्यात त्याचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. तसेच त्याने रचलेला कौटिलीय अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक दैदीप्यमान ग्रंथ मानला जातो. २५ प्रकरणे व सहा हजार श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या धोरणास 'चाणक्यनीती' वा 'दंडनीती' म्हणून ओळखतात. प्राचीन संस्कृत भाषेत फारच थोडे लिखाण गद्यात आढळते. कौटिलीय अर्थशास्त्र हा अशा मोजक्या गद्य संस्कृत साहित्यातील एक ग्रंथ आहे. चाणक्याच्या लेखनाचा परिणाम त्याकाळी व त्यानंतर रचलेल्या अनेक ग्रंथांवर झालेला आढळतो. उदाहरणार्थ, योगेश्वर याज्ञवल्क्याने लिहिलेली याज्ञवल्क्य स्मृती व वात्सायनाने लिहिलेले कामसूत्र हे ग्रंथ. पंचतंत्र या विख्यात ग्रंथाचा कर्तादेखील ततो धर्मशास्त्राणि मन्वादीनि, अर्थशास्त्राणि चाणक्यादीनि, कामशास्त्राणि वात्स्यायदीनि या श्लोकातून अर्थशास्त्राचे महत्त्व मान्य करतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →