गुरुनाथ विष्णू नाईक (जन्म - इ.स. १९३८ ) हे रहस्यकथालेखक व पत्रकार आहेत. इसवी सन २०१३ मध्ये जगात सर्वाधिक १२०८ कादंबऱ्या लिहिल्याबद्दल त्यांचे नाव "लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस"मध्ये समाविष्ट करण्यात आले होते. अशी कामगिरी करणारे ते मराठीतील एकमेव लेखक आहेत. १९७० ते १९९० च्या दशकात महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागांत वाचन संस्कृती रुजवण्यात त्यांच्या 'पॉकेट बुक्स' आकारातील रहस्यकथांचा मोठा वाटा होता. रहस्यकथांच्या दुनियेत त्यांनी निर्माण केलेले 'कॅप्टन दीप', 'गरुड', 'उदयसिंह चौहान' हे नायक आजही जुन्या वाचकांच्या स्मरणात आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →गुरुनाथ नाईक
तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!