गुप्त साम्राज्य

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

गुप्त साम्राज्य

गुप्त साम्राज्य हे भारताच्या उत्तरेकडील मोठ्या भूभागावर इसवी सनाच्या तिसऱ्या ते पाचव्या शतकापर्यंत होते. गुप्त राज्याची स्थापना श्रीगुप्त याने केली व दोन पिढ्यानंतरच म्हणजे पहिल्या चंद्रगुप्ताच्या काळात गुप्त राज्याचे साम्राज्य झाले. गुप्त साम्राज्याचा काळ भारतीय इतिहासातील सुवर्णकाळ होता, असे इतिहासकार मानतात. या काळात भारताने कला, साहित्य व विज्ञानात खूप मोठी मजल मारली. या गुप्त साम्राज्याचा कार्यकाळ इ.स. २४० ते इ.स. ५५० पर्यंत मानला जातो. गुप्तांच्या साम्राज्याचा इतिहास छोट्या राज्यातून बलाढ्य साम्राज्यात रूपांतरीत झालेला आहे श्रीगुप्त हा गुप्त वंशाचा संस्थापक होता त्याच्या नावामागे महाराज अशी पदवीही लावलेले आढळते यावरून असं लक्षात येतं की तो एक मांडलिक शासक होता त्याचा मुलगा घटोत्कच यानेही महाराज हेच बिरुद धारण केलं यावरून या काळात गुप्त राजे हे मांडलिक शासक होते गुप्त राज्याचा विस्तार वाढवून त्याचे साम्राज्यात रूपांतर करण्याचं श्रेय हे पहिल्या चंद्रगुप्त यांच्याकडे जाते त्याच्या नावा आधी जोडलेल्या महाराजाधिराज या पदवीने गुप्त राजांच्या वाढलेल्या प्रतिष्ठेची कल्पना येते त्याने लिच्छवी कुळातील कुमारदेवी हिच्या बरोबर विवाह केला हा विवाह गुप्त घराण्याला राजकीय दृष्ट्या फायदेशीर ठरला कुमारदेवी बरोबर प्रतिमा असलेले त्याचे नाणे ही त्याने काढले गुप्त काळामध्ये अनेक देवदेवतांच्या प्रतिमा असलेली नाणी प्र चलनात आणली गेली गुप्त शासकांनी धर्म कला व संस्कृतीला प्रोत्साहन दिले सांस्कृतिक दृष्ट्या उत्कर्षाचा हा काळ होता

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →