कुणबी

यामागील विज्ञान आणि इतिहास.

कुणबी मराठा (कृषी करणारे क्षत्रिय)' ही महाराष्ट्रातील शेती करणारी मराठा शेतकरी जमात आहे. या समाजातील लोक प्रामुख्याने शेतीचा व्यवसाय करतात.

कुणबा हा मूळ फारशी आणि उर्दू आणि हिंदी मध्ये वापरला जाणारा शब्द आहे.हा शब्द संस्कृत कुटुंबी या शब्दाचा अपभ्रंश होऊन तयार झालाआहे. कुनबा या फारशी उर्दु, शब्दाचा अर्थ आहे .परिवार..खानदान, कुळ,भावकी.म्हणजे जे लोकं कुटुंब ,परिवार किवा कुळ तयार करून राहिले ते लोकं म्हणजे ज्यांचा कूनबा म्हणजे खानदान ज्यांचे घरदार एका ठिकाणी स्थीर होते असे कुणबा (परिवार, खानदान)

तसेच संत गुलाबराव महाराज (६ जुलै १८८१ - २७ सप्टेंबर १९१५) हे महाराष्ट्रातील एक कुणबी हिंदू संत होते. त्यांनी 34 वर्षांच्या आयुष्यात 6000 हून अधिक पाने, 130 भाष्ये आणि कवितेतील सुमारे 25,000 श्लोक असलेली विविध विषयांवर 139 पुस्तके लिहिली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू म्हणजेच जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज हे कुणबी समाजाचे समजले जातात. त्यांनी आपल्या अभंगात आपण कुणबी असल्याचे सांगितले आहे.

महाराष्ट्राच्या बाहेर कुणबी समाज वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. गुजरातमध्ये कुणबी समाज पाटीदार म्हणून ओळखला जातो. त्याचप्रमाणे केरळमध्ये कुडुंबी म्हणून ओळखले जाते.

अंबी खोऱ्यातल्या भरपूर पावसाच्या डोंगरी मुलुखातल्या अगदी साध्या रचनेच्या समाजात कुणबी आणि धनगर गवळ्यांच्या लहान लहान वस्त्या होत्या. बहुतेक वस्त्यांच्यात केवळ एक एक गोतावळ्यातले लोक रहात होते. कुणबी आंबीच्या काठी भात शेती आणि खालच्या डोंगर उतारांवर १५ वर्षाच्या चक्रातली फिरती कुमरी शेती करायचे. ते केवळ शेतीच्या कामासाठी थोडेसे बैल-गायी सांभाळायचे. त्या गायी फारसे दूध द्यायच्या नाहीत. त्यांच्या प्रथिनांच्या गरजा भागवण्यासाठी ते डोंगरात भरपूर संख्येने आढळणाऱ्या भेकर, रान डुक्कर, सायाळ आणि घोरपडींची शिकार करायचे. धनगर-गवळी डोंगरात वरवरच्या पठारांवर आणि सड्यांवर राहायचे. म्हशी आणि गायींचे मोठमोठे कळप पाळणे हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय होता. पुण्याला दूध पुरवणे सुरू व्हायच्या आधी ते बहुतेक सर्व दुधाचे ताक करायचे, घरीच ताक प्यायचे आणि धान्याच्या बदली कुणब्यांना लोणी द्यायचे. अल्पप्रमाणात ते वरच्या डोंगर उतारांवर कुमरी शेती करायचे. ताकातून भरपूर प्रथिन मिळत असल्याने ते फारशी शिकार करायचे नाहीत. एकूण कुणबी नदीकाठी आणि खालच्या डोंगर उतारावरची शेती आणि पुऱ्या डोंगरात शिकार करायचे. धनगर-गवळी वरच्या डोंगर उतारांवर शेती आणि पशुपालन करायचे; फारशी शिकार करत नसत. नैसर्गिक संसाधनांच्या वापराच्या संदर्भात या दोन समाजांची भूमिका अगदी वेगळी वेगळी होती किंवा परिसर शास्त्राच्या परिभाषेत एकाच भौगोलिक क्षेत्रात राहणाऱ्या या दोन हिंदू जातींची परिभूमिका पूर्णपणे वेगळी वेगळी होती. या परंपरागत व्यवस्थेत विशिष्ट संसाधनांवर या दोन गटांची आपापली मक्तेदारी होती, आणि ही मक्तेदारी टिकून राहील अशी शाश्वती असताना ते गट आपापली संसाधने काळजीपूर्वक सांभाळून संयमाने वापरत होते. आम्ही अभ्यास केला त्या वेळी धरण आणि त्यातून बाहेरच्या समाजाशी संपर्क आल्याने ही परंपरा व व्यवस्था कोलमडून पडायला लागली होती.

मराठवाडा, ठाणे, पालघर, रायगड, रत्‍नागिरी, अमरावती, अकोला, यवतमाळ, तसेचविदर्भात मोठ्या संख्येने हा समाज आहे. महाराष्ट्रात या समाजाचे एकूण प्रमाण सुमारे ३२% असून तो इतर मागास वर्ग (ओबीसी) या प्रवर्गात मोडतो.



चौदाव्या शतकात आणि नंतरच्या काळात अनेक कुणबी, ज्यांनी विविध राज्यकर्त्यांच्या सैन्यात लष्करी पुरुष म्हणून नोकरी केली होती. कुणबी लोकांची कुणबी बोलीभाषा असून ती वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळी बोलली जात असली तरी त्या भाषेमध्ये येणारे विशिष्ट काही शब्द, गाणी, चाली-रीती, म्हणी, संदर्भ हे फक्त त्याचं बोलीभाषेमध्ये दिसून येत असून त्याद्वारे कुणबीयांची संस्कृती दिसते. कुणबी, कणबी किंवा कुळंबी अशीहि या जातींची नावे आढळतात. मनुस्मृतींच्या ७ व्या अध्यायांत ११९ वा श्लोक व त्यावरील कुल्लूकाची व्याख्या यांच्या आधारें कुळंबी यांची फोड पुढीलप्रमाणे होते. एकेक नांगरास सहा बैल लागतात याला षड्ग व नांगर म्हणतात. अशा दोन नांगरांनीं जेवढी जमीन वाहिली जाईल तेवढील कूल अशी संज्ञा आहे. यावरून कूल हा शब्द मनुसंहितेपासून भारतवर्षांत प्रचलित आहे. या कूल शब्दाचा उच्चार मराठींत आदेशप्रक्रियान्वयें कूळ असा होतो. एका कुळाचा म्हणजे १२ बैलांनीं वाहिलेल्या जमीनीचा जो कर्ता त्यांचें नांव कुळपति. कुळपति-कुळवइ-कुळवी-कुणबी असा हा शब्द बनला असावा. पूर्वी कुणबी ही जात नव्हती तर नुसता व्यवसाय होता. ती नंतर जात झाली. कुनब्यांची लोकसंख्या मध्यप्रदेश आणि छतीसगढ राज्यात सुद्धा आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →