अशोक नायगावकर

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

अशोक नायगावकर (डिसेंबर २९, इ.स. १९४७; वाई, महाराष्ट्र - हयात) हे मराठी भाषेतील कवी आहेत.

नायगावकरांनी बी.कॉम. पदवीपर्यंत शिक्षण केले. लग्न झाल्यावर ते हे करंबेळकर वाडी, गावठाण चेंबूर येथे राहत असत. शिक्षणानंतर त्यांनी बँक ऑफ बरोडा या बँकेत ३१ वर्षे नोकरी केली आणि मग स्वेच्छानिवृत्ती घेतली.

इ.स. २०१२ मध्ये दापोली येथे झालेल्या १४व्या कोकण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अशोक नायगावकर होते. या संमेलनात ते म्हणाले होते,'महाराष्ट्रात लेखक घडवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला पाहिजे.' उपरोधाच्या माध्यमातून गंभीर समाजचिंतन करणारे कवी अशी त्यांची ओळख आहे. वाचनाने संस्कृती सुधारते, वाचन वाढवा, त्यामुळे तुम्ही समृद्ध व्हाल, असे ते म्हणतात. इस्त्रायल, कतार, डेट्राईट, दुबई, न्यूकॅसल, पिट्सबर्ग, फिलाडेल्फिया, बँकॉक, बफेलो, लंडन, लॉसएंजेलिस, शिकागो, सिंगापूर, इत्यादी ठिकाणी महाराष्ट्र मंडळामध्ये कवितेच्या मैफली त्यांनी केल्या आहेत. लोकसत्ता या वृत्तपत्रात गद्य लिखाणही त्यांनी केले आहे. त्यांच्या कविता सत्यकथा या प्रतिष्ठेच्या प्रकाशनात छापून येत असत.

नायगावकर मंचावर उभे राहिले, की काहीतरी रंगतदार, मजेदार ऐकायला मिळणार या उत्सुकतेने श्रोतृवर्ग कान टवकारत असतो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →