अन्नप्राशन

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

अन्नप्राशन हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी नववा संस्कार आहे.

जन्मदिवसापासुन, ६/८/९/१० वा १२व्या महिन्यात बालकास अन्नप्राशन करावे. देवतांची पूजा, होम करून व दही, मध, तुप यांनी युक्त अन्न/खीर बालकाला द्यावी.

गृह्यसूत्रे नावाच्या ग्रंथांमध्ये अशा विविध संस्कारांची माहिती दिलेली आहे. मुलाला अन्न भरवून झाल्यानंतर त्याच्या समोर वस्त्र, शास्त्र, ग्रंथ अशा वस्तू मांडून ठेवतात. ज्या वस्तूला मूळ स्पर्श करेल त्या वस्तूच्या संबंधी ते आपला चरितार्थ चालवेल अशी कल्पना मानली गेली आहे. मुलाला तेज, कांती प्राप्त व्हावी म्हणून वडिलांनी त्याला मांस, मासे किंवा भातामध्ये दही, दूध, तूप मिसळून ते द्यावे असे शांखायन स्मृती या ग्रंथात सांगितले आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →