गर्भाधान हा हिंदू धर्मातील सोळा संस्कारांपैकी पहिला संस्कार होय. शौनकाने त्याची व्याख्या अशी दिली आहे-
अर्थ- ज्या कर्माच्या पूर्तीने स्त्री पतीद्वारा प्रदत्त अशा गर्भाचे धारण करते त्याला विद्वान लोक गर्भाधान असे म्हणत. म्हणजे योग्य दिवशी, योग्य वेळी, पवित्र व मंगलमय वातावरणात आनंदी मनाने स्त्री-पुरुषांचे मीलन होऊन स्त्रीच्या गर्भाशयात गर्भाची बीज रूपाने स्थापना होणे.
रजोदर्शनापासून १६ रात्रींपर्यंत स्त्रियांच्या ऋतुकाळी गर्भसंभव होऊ शकतो. या संस्कारासाठी ऋतुदर्शनापासून पहिल्या चार रात्री वर्ज्य कराव्या.त्या दिवशी अशुभ दिवस, ग्रहणदिवस, कुयोग असू नये. समरात्री संभोग केल्यास पुत्र व विषमरात्री संभोग केल्यास कन्या संतति होते, असा समज आहे. या दिवशी स्त्रीला सुशोभित आसनावर बसवीत, ओवाळून औक्षण करत. तिने चांगले दागिने, फुलमाला, (गजरा)इ. परीधान करून आणि नंतर पतीशी मीलन करावे, अशी पद्धत होती.
गर्भाधान संस्कार
याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?