अजमल कसाब

थोडक्यात पण महत्त्वाचे.

मोहम्मद अजमल आमीर इमान ऊर्फ अजमल कसाब (जुलै १३, इ.स. १९८७ - २१ नोव्हेंबर, इ.स. २०१२) हा नोव्हेंबर २६ २००८ रोजी महाराष्ट्रातील मुंबई शहरात घडवून आणलेल्या दहशतवादी हल्ल्यांत सामील झालेला एक पाकिस्तानी दहशतवादी . या हल्ल्यांमध्ये अटक झालेला कसाब हा एकमेव दहशतवादी होता. पाकिस्तानने आधी कसाब त्यांचा नागरिक असल्याचा इन्कार केला होता. परंतु ७ जानेवारी, इ.स. २००९ रोजी पाकिस्तान सरकारने कसाब हा पाकिस्तानीच असल्याचे अधिकृत रित्या मान्य केले.

अजमल कसाब यास तुकाराम ओंबळे यांनी गिरगाव चौपाटी वर अटक केली. अटक करत असताना तुकाराम ओंबळे यांना आपल्या प्राणांची आहुति द्यावी लागली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →