सय्यद अकबर हुसैन रिझवी तथा अकबर इलाहाबादी (१६ नोव्हेंबर, इ.स. १८४६,:बारा, अलाहाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश, भारत; इ.स. १९२१:अलाहाबाद) हे एक उर्दू कवी होते.
त्यांच्या वडिलांचे नाव सय्यद तफज्ज़ल हुसैन होते. अकबर इलाहाबादी यांना घरच्या गरीब परिस्थितीमुळे फक्त एक वर्ष शाळेत जायला मिळाले. पुढील शिक्षण त्यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी मिळवले. इ.स. १८६६मध्ये ते मुलकी परीक्षा पास होउन नायब तहसीलदार झाले; १८०७ साली अलाहाबाद उच्च न्यायालयात कोर्टाचे कागद सांभाळण्याचे काम करू लागले. इ.स. १८७२मध्ये ते वकिलीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि पुढे त्यांनी १८८० सालापर्यंत वकिली केली. इ.स. १८८८मध्ये सब जज होऊन, ते शेवटी जिल्हा न्यायाधीशपदावरून निवृत्त झाले.
अकबर इलाहाबादी
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.