हावडा ब्रिज

या विषयातील रहस्ये उलगडा.

हावडा ब्रिज

हावडा ब्रिज (बांग्ला: হাওড়া ব্রিজ; अधिकृत नाव: रवींद्र सेतु) हा भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील हुगळी नदीवर बांधलेला ऐतिहासिक ब्रिटिशकालीन पूल आहे. ३ फेब्रुवारी १९४३ रोजी वाहतूकीस खुला करण्यात आलेला हा पूल कोलकाता शहराला हावडा ह्या उपनगरासोबत जोडतो. कोलकात्यामधील सर्वात लोकप्रिय खुणांपैकी एक असलेला हावडा पूल इ.स. १९३७ ते १९४३ दरम्यान बांधला गेला. जगप्रसिद्ध बंगाली कवी रविंद्रनाथ टागोर ह्यांच्या आदराप्रिथ्यर्थ १९६५ साली हावडा पूलाचे नाव बदलून रवींद्र सेतु ठेवण्यात आले पण अजुनही हावरा पुल ह्याच नावाने ओळखला जातो. रोज अंदाजे १.५ लाख वाहने व ४० लाख पादचारी ह्या पुलाचा वापर करतात. हावडा रेल्वे स्थानक हे भारतामधील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक ह्या पूलाच्या पश्चिम टोकाजवळच स्थित आहे. ह्यामुळे हावडा पूलाला कोलकात्याचे प्रवेशद्वार असेही संबोधतात. हावडा स्थानकाहून कोलकात्याला जाण्यासाठी केवळ हावडा पूलाचाच वापर केला जातो.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →