सूर्यसिद्धान्त हा खगोलशास्त्रावरील संस्कृत भाषेतला प्राचीन ग्रंथ आहे. हा ग्रंथ स्वतः सूर्याने मयासुराला कृतयुगाच्या शेवटी कथन केला, अशी एक पौराणिक समजूत आहे. याचा अर्थ असा की सूर्यसिद्धान्त नेमका कुणी लिहिला ते माहित नाही. या ग्रंथाचा काळ इ.स पूर्व ६०० असावा असे मानले जाते. या सिद्धांताच्या एका हस्तलिखितांंत उल्लेख आहे कि सूर्य,असुुर मायाला साांगतो कि, ग्रीक-रोमन हे जगाचे प्रतिनिधित्व करीत असुन तु तेथे जा मी तुला हे ज्ञान यवानाच्या वेषात प्रकट करीन. खगोलशास्त्र व गणित यांचा शोध सगळ्यात आधी सुमेर संस्कृति ( नंतरचे मेसोपोटामिया) मधे साधारण ४००० ई.स. पू.च्या आसपास लागल्याचे ऐतिहासिक पुरावे आहेत.सुमेर लोकांना गणित व ग्रह तारे, त्यांचे आकार व भ्रमण यांचे सखोल ज्ञान होते.भारतात वेदिक संस्कृति १५०० ई.स.पूर्व.नंतर आली व ऋवेद काळात आर्य हे विज्ञान क्षेत्रांत पारंगत असल्याचे ऐतिहासिक पुरावे नाहित.त्यामुळे सुर्यसिद्धांत हा सुमेर संस्कृति व 'ग्रीक खगोलशास्त्रीय ग्रंथांची भारतीय आवृत्ती असावा असे तज्ञांचे मत आहे. इसवी सनपूर्व तिसऱ्या शतकातील बौद्ध ग्रंथात याचे उल्लेख आहेत. पैतमाह सिद्धान्त, त्यांच्या ज्ञानाचा स्रोत म्हणुन सूर्यसिद्धांताचेलन्त आणि रोमक सिद्धान्त या ग्रंथांतही सूर्यसिद्धान्ताचा उल्लेख आहे. वराहमिहीर आणि आर्यभट्ट यांच्या लेखनात त्यांचा ज्ञानाचा स्रोत म्हणुन याच सूर्य सिद्धांतचे संदर्भ आहेत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →सूर्यसिद्धान्त
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.