सुभाष भेंडे (ऑक्टोबर १४, इ.स. १९३६; बोरी, गोवा - डिसेंबर २०, इ.स. २०१०; मुंबई, महाराष्ट्र) हे मराठी साहित्यिक होते.
ऑक्टोबर १४, इ.स. १९३६ रोजी गोव्यातील बोरी या गावात भेंड्यांचा जन्म झाला. केपे या स्वतःच्या मूळ गावातून ते शिक्षणासाठी सांगली येथे गेले. त्यांचे शिक्षण सांगली व पुण्यात झाले होते. त्यांनी अर्थशास्त्र विषयात डॉक्टरेट मिळवली होती. ते मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते. गोवा मुक्तिसंग्रामानंतर प्रकाशझोतात आलेल्या साहित्यिकांपैकी ते एक होते. इ.स. २००३ साली कराड, महाराष्ट्र येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. तसेच वळवयी येथे झालेल्या २१ व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.
डिसेंबर २०, इ.स. २०१० रोजी मेंदूतील रक्तस्रावामुळे (की हृदयविकाराच्या झटक्याने ?) त्यांचे मुंबई येथील निवासस्थानी निधन झाले. त्यांच्या साहित्यावर प्रल्हाद वडेर यांनी
’सुभाष भेंडे यांचे साहित्यविश्व’ नामक ग्रंथ लिहिला आहे.
प्रा. सुभाष भेंडे यांनी आपल्या अमेरिकावारीनंतर ’गड्या आपुला गाव बरा’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला होता. तो महाराष्ट्रातील बारावीच्या पाठ्यपुस्तकासाठी निवडला गेला. त्या लेखाचे पाठ्यपुस्तक मंडळाने काय हाल केले त्याची हकीकत गड्या आपुला गाव बरा येथे वाचता येईल.
सुभाष भेंडे
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.