साहित्य समीक्षकांचे पहिले संमेलन २९-३० नोव्हेंबर २०१२ रोजी पुण्यात झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे असणाऱ्या ८२ लक्ष रुपये निधीच्या व्याजातून हा उपक्रम झाला. संमेलनाध्यक्ष प्रा. के.रं. शिरवाडकर होते.
संमेलनाचा कार्यक्रम असा होता.
२९ नोव्हेंबर २०१२ संध्याकाळी ६ वाजता, ’साहित्य-समाज व संस्कृती’ या विषयावर के.रं. शिरवाडकरांचे बीजभाषण
नंतरच्या सत्रात, वसंत आबाजी डहाके यांचे भाषण
३० नोव्हेंबर २०१२, ’साहित्याची बांधिलकी आणि लेखकाचे स्वातंत्र्य’, आदी ६-७ विषयांवर वक्ते त्यांचे विचार मांडतील.
वक्त्यांची नावे - गिरीश कुबेर, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. नीलिमा गुंडी, डॉ. किसन पाटील, डॉ. रेखा साने-इनामदार, डॉ. मंगला आठलेकर, डॉ.मनोहर जाधव.
समीक्षकांचे संमेलन
यामागील विज्ञान आणि इतिहास.