श्रीपाद रघुनाथ जोशी

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

श्रीपाद रघुनाथ जोशी ( कोल्हापूर जिल्हा, इ.स. १९२० - २४ सप्टेंबर, इ.स. २००२ हे मराठी लेखक, शब्दकोशकार व अनुवादक होते. पुण्याच्या शुभदा प्रकाशनाने कै. कृ.पां. कुलकर्णी यांच्या मराठी व्युत्पत्तीकोश या मौल्यवान ग्रंथाची तिसरी आवृत्ती इ.स. १९९३ मध्ये काढली. त्या व्युत्पत्ती कोशात अरबी, तुर्की, फारसी भांषांतून आलेल्या शब्दांची नीटशी दखल घेतली गेली नसल्याने, प्रकाशकाच्या विनंतीनुसार श्रीपाद जोशी यांनी डबल क्राऊन आकाराच्या ७५ पृष्ठांची पुरवणी तयार केली व ती त्या व्य़ुत्पत्ती कोशाला जोडण्यात आली.

जोशी यांनी महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. त्याबद्दल त्यांना ब्रिटिश सरकारने ठोठावलेल्या शिक्षेमुळे १९४२ ते १९४४ या काळात येरवडा तुरुंंगात कारावास भोगावा लागला. महात्मा गांधींशी त्यांचा व्यक्तिगत पत्रव्यवहार होता.

जोशींनी हिंदी-मराठीत विविध विषयांवरील सुमारे १९४ पुस्तके लिहिली. त्यांपैकी किमान सात महात्मा गांधींच्या आयुष्याच्या विविध अंगांबद्दल होती, तर एक मुसलमानी संस्कृतीबद्दल होते. याशिवाय जोशींनी लिहिलेल्या प्रवासवर्णनाचे ७ खंड आहेत. त्यांनी काही उर्दू काव्याचे मराठी भाषांतरही केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →