शिखंडी

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

शिखंडी महाभारत या महाकाव्यातील एक पात्र.

पितामह भीष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रूपाने पुन्हा जन्म घेतला. (भीष्माने अंबेशी लग्न करण्यास नकार दिला होता.) शिखंडी हा तृतीयपंथी असून शिखंडीच्या रूपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भीष्माचार्यांना अवगत होते. महाभारत युद्धात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहिले नाही किंवा त्यावर शरसंधानही केले नाही. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारून पितामह भीष्म यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांच्या शय्येवर) पाडले.

या घटनेमुळे महाभारताच्या युद्धाला वेगळी कलाटणी मिळाली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →