शाश्वत शेती

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

शाश्‍वत शेती (इंग्रजी:Sustainable Agriculture) म्हणजे जमीन, पिके, वने, पशुधन, वन्यजीव, मासे, पर्यावरण इत्यादी पुनःर्जीत करण्याजोगे स्रोतांच्या प्रतवारीचा घसारा न होऊ देता संतुलीत व्यवस्थापन करून वर्तमान व भावी पिढीसाठी अन्न, वस्त्र व निवारा यांचा पुरवठा करणे होय. शाश्‍वत शेतीला सेंद्रीय शेती, नैसर्गिक शेती, पर्यावरणीय शेती असेही म्हणतात. शाश्‍वत शेतीत पर्यावरण संतुलनाला जास्त महत्त्व दिले जाते. म्हणून तिला पर्यावरणीय शेती म्हणतात. शाश्‍वत शेतीसाठी अन्नद्रव्ये व्यवस्थापनासाठी सेंद्रीय पदार्थ मुख्य स्रोत म्हणून वापरतात. शाश्वत शेतीचा मूलमंत्र देत जगविख्यात कृषी तज्ञ व प्रगतशील शेतकरी वसंतराव नाईक याांनी शेती व शेतकरी हितासाठी संदेश दिला.

शाश्वत शेतीला सेंद्रिय शेती असेही म्हणले जाते. भावी पिढीला आवश्यक असणाऱ्या मूलभूत स्रोतांना कोणत्याही प्रकारची हानी पोहचू न देता वर्तमान पिढीच्या गरजा भागवण्यासाठी अवलंबिण्यात आलेली शेतीची पद्धत होय.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →