शापित हा सामाजिक समस्या हाताळणारा मराठी चित्रपट ट्रॉयका फिल्म्स कंबाइन या चित्रपट निर्मिती संस्थेसाठी निर्माते मधुकर रूपजी, सुधा चितळे आणि विनय नेवाळकर यांनी १९८२ साली निर्माण केला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अरविंद देशपांडे आणि राजदत्त यांनी केले असून कथालेखिका स्त्रेहलता दसनूरकर यांच्या कथेवर तो आधारित आहे. चित्रपट निर्मितीचा विशेष म्हणजे अरविंद देशपांडे यांच्या आजारपणामुळे दिग्दर्शन श्री. राजदत्त यांनी पूर्ण केले.
चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट मिळाला.
पटकथा ग.रा. कामत यांनी लिहिली असून संवादलेखन यशवंत रांजणकर यांचे आहे.
शापित (मराठी चित्रपट)
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.