वासुदेव नरहर सरदेसाई (जन्म: कान्हे(चिपळूण-रत्नागिरी, ६ मार्च १९३७) हे एक मराठी गझलकार आहेत. गुजरात विद्यापीठातून त्यांनी एफ.वाय.बी.एची परीक्षा इ.स.१९५७ साली दिली आणि शिक्षण सोडले.
वा.न. सरदेसाई यांनी कविता आणि गझलांशिवाय काही नाटकेही लिहिली आहेत. त्यांच्या कविता आणि गझला अनेक मराठी नियतकालिकांतून, विशेषांकांतून आणि दिवाळी अंकांतून प्रसिद्ध झाल्या आहेत.
वा.न. सरदेसाई हे आकाशवाणीचे मान्याताप्राप्त कवी आणि नाट्य-अभिनेते आहेत. दूरचित्रवाणीवर त्यांचे काव्यवाचनाचे कार्यक्रम झाले आहेत.
अमरावती, औरंगाबाद, नासिक आणि मुंबई या थहरांत झालेल्या मराठी गझल संमेलनांत सरदेसाईंचा सहभाग होता
वासुदेव नरहर सरदेसाई
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.