वामन होवाळ

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

वामन होवाळ (इ.स. १९३५:तडसर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र - २३ डिसेंबर, इ.स.२०१६:विक्रोळी, मुंबई, महाराष्ट्र) हे आंबेडकरी साहित्य चळवळीमध्ये सक्रिय असलेले एक मराठी साहित्यिक होते.

मूळचे सांगलीचे असलेले होवाळ उच्च शिक्षणासाठी मुंबईला आले. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण आधी ठाण्यात आणि नंतर फोर्टमधील सिद्धार्थ महाविद्यालयात झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते भारतीय रेल्वेत नोकरीला लागले.

यांची पहिली माणूस ही कथा इ.स. १९६३मध्ये कथालक्ष्मीच्या अंकात प्रसिद्ध झाली. त्यानंतर सत्यकथा, यशवंत, राजश्री, वसुधा, धनुर्धारी आदी मासिकांमधून त्यांच्या कथा प्रसिद्ध झाल्या.

त्यांनी पानतावणे यांच्या अस्मितादर्श या नियतकालिकातही लेखन केले. होवाळ यांना दलित साहित्यिकांतील प्रमुख साहित्यिकांतील एक समजले जाते. पहिल्या फळीत वामन होवाळ यांचे नाव घेतले जात

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →