राष्ट्रीय संस्कृत संस्थान ही एक शैक्षणिक संस्था आहे. ते भारत सरकारद्वारे संपूर्ण अर्थसहाय्य करण्यात आलेले एक मानीत विद्यापीठ आहे . भारत सरकारने संस्कृत आयोग (१९५६-१९५७)च्या शिफारसींच्या आधारावर, संस्कृतच्या विकास आणि प्रसारासाठी व संस्कृत या भाषेसंबंधी, केंद्रीय सरकारची धोरणे आणि कार्यक्रम यांच्या अंमलबजावणीच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर १९७०ला एक स्वायत्त संस्था म्हणून राष्ट्रीय संस्कृत संस्था स्थापन केली. सध्या या मानीत विद्यापीठाचे तेरा संकुल, देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत. त्यात मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ शहरात एक शिक्षासत्र, सन २००२-२००३ पासून 'भोपाळ कॅम्पस' येथे सुरू आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →राष्ट्रीय संस्कृत संस्थान (भोपाळ)
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.