राष्ट्रकूट राजघराणे

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

राष्ट्रकूट राजघराणे

राष्ट्रकूट हे इ.स. ७५३ - इ.स. ९८२ या कालखंडादरम्यान भारतीय उपखंडाच्या दक्षिण, मध्य व काही अंशी उत्तरेकडील भूभागावर पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारे क्षत्रिय मराठा राजघराणे होते. या कालखंडात राष्ट्र कुटांनी आंतरसंबंधित, परंतु स्वतंत्र असणाऱ्या विविध कुळशाखांमधून राज्य केले. राष्ट्रकूट राजघराणे याच्या भरभराटीच्या काळात राष्ट्रकुटांची सत्ता ही विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारीपर्यंत पसरलेली होती. दंतिदुर्ग हा या घराण्यातील प्रथम सत्ताधीश, त्याची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती. कृष्णराजा पहिला याने वेरुळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदले.

राष्ट्रकूट राजा अमोघवर्षाच्या काळात जैन धर्माचा प्रसार झाला. अजिंठा-वेरूळ येथील लेणी राष्ट्र कुटांच्या काळात कोरण्यात आली. गोविंद राष्ट्रकुट १ला हा राष्ट्रकूट साम्राज्याचा प्रभावी राजा होऊन गेला त्याने साम्राज्य विस्तारासाठी मोठे प्रयत्न केले. राष्ट्रकुटांच्या कालखंड हा महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये वैभव संपन्न असा कालखंड होता, या काळामध्ये सांस्कृतिक दृष्ट्याही महाराष्ट्राचे मोठी प्रगती घडून आली. राष्ट्रकूट घराण्यातील दंतिदुर्ग हा पहिला पराक्रमी शासक होता राष्ट्रकूट घराण्याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती. दंतिदुर्ग यानंतर त्याचा चुलता कृष्ण पहिला हा गादीवर आला, त्याने चालुक्यांची सत्ता समुळ नष्ट केली. कृष्ण पहिला या राजाने वेरुळचे प्रसिद्ध कैलास मंदिर खोदले, त्यानंतर आलेल्या राष्ट्रकूट राजांनी उत्तर भारतात आपला प्रभाव निर्माण केला. अमोघवर्ष हा राष्ट्रकूट घराण्यातील कर्तबगार राजा होता. त्यांनी रत्नमालिका व कवी राजमार्ग या दोन ग्रंथांची रचना केली. त्याने सोलापूर जवळ मानखेड किंवा मालखेड हे नवे नगर वसवले. परमार आणि कल्याणीचे चालुक्य यांनी केलेल्या आक्रमणाने राष्ट्रकूट घराण्याचा रास झाला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →