रावसाहेब रामराव पाटील ऊर्फ आर. आर. पाटील (१६ ऑगस्ट, १९५७; आंजणी (तासगांव) - १६ फेब्रुवारी, २०१५; मुंबई) हे महाराष्ट्रातील राजकारणी होते. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सदस्य, महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री होते. ते लोकांमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व प्रामाणिक नेते म्हणून प्रसिद्ध होते. ते इ.स. १९९० पासून ते २०१५ पर्यंत सांगली जिल्ह्यातील तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.
२६ नोव्हेंबर, २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्यानंतर पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यांनंतर बेजबाबदार वक्तव्यांसाठी आर.आर. पाटील हे टीकेचे लक्ष्य बनले होते. यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला .
रावसाहेब रामराव पाटील
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.