मेहकर

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

मेहकर

मेहकर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे. मेहकर तालुक्यातून जगातील नदी पैनगंगा वाहते. मेहकरचे जागतिक भूषण मेहकरच्या तीन गोष्टी जागतिक दर्जाची भूषणास्पद आहेत.(१) येथील त्रिविक्रम विष्णू शारंगधर बालाजी मूर्ती व मंदिर. (२) जगप्रसिद्ध अकरांपैकी सहावे नरसिंह स्थान व मंदिर येथे आहे. ही मूर्ती जवळपास १५०० वर्षे (उत्तर चालुक्य काळातील) जुनी असून इ. स. १५६९ मध्ये भूगर्भात सापडून मंदिरात पुनर्स्थापित करण्यात आली. (३) आदिशक्ती मुक्ताबाईच्या परंपरेतील संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे (ॐब्रह्मी श्वासानंद सरस्वती) यांचे गुरूपीठ श्रीक्षेत्र ज्ञानमंदीर, श्री नरसिंह संस्थान मेहकर येथे आहे. त्यांचा शिष्यवर्ग भारत व भारताबाहेर पसरलेला असून त्यांचे चरित्र दिव्य व बोधप्रद आहे.

मेहकर तालुक्यात चैत्र, श्रावण, भाद्रपद व मार्गशीर्ष या महिन्यांमध्ये विविध उत्सव साजरे केले जातात. तालुक्यात असलेल्या एका गढीचे खोदकाम सुरू असताना १८८८ मध्ये येथे बालाजीची मूर्ती सापडली. अखंड शिळेत अत्यंत कलाकुसरीने कोरलली ही रेखीव मूर्ती पाहून तत्कालीन इंग्रज जिल्हाधिकारी टेंपल यांनी ही मूर्ती लंडनला नेण्याचे ठरवले परंतु, परिसरातील लोकांचा विरोध पाहून त्याने निर्णय बदलला पण, मूर्तीसोबत सापडलेले तांबे, पितळ, सोने या धातूंत कोरलेले शिलालेख व जडजवाहीर मात्र हा इंग्रज अधिकारी सोबत घेऊन गेला, असा उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये आहे, असे म्हणतात. १८९२ मध्ये बालाजी मंदिराचा गाभारा व तीर्थ मंडपाचे काम झाले. कालांतराने मंदिराचे बांधकाम वाढत गेले.



संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे

मेहकर,जिल्हा बुलडाणा येथे परमहंस परिव्राजकाचार्य १००८ ओम ब्रह्मी श्वासानंद सरस्वती उपाख्य संत श्री बाळाभाऊ महाराज पितळे यांचे ज्ञानमंदीर हे हंस संप्रदायाचे गुरूपीठ तसेच प्राचीन कालीन एकादश नृसिंहातील ६वे प्रह्लादवरद लक्ष्मीनृसिंह मंदिर असून येथे विद्यमान गुरुपीठाधिश ॲड.रंगनाथ महाराज पितळे (बाबासाहेब)यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारचे धार्मिक,पारंपरिक, सामाजिक कार्यक्रम होतात.

संत बाळाभाऊ महाराज पितळे उपाख्य ॐ ब्रम्ही श्वासानंद सरस्वती मेहकर

मूळ नाव संत बाळाभाऊ महाराज पितळे

जन्म इ.स.१८८८ मेहकर येथे झाला.त्यांची

संजीवन समाधी श्री श्वासानंद आश्रम, जंगमवाडी,वाराणसी(उ.प्र.) येथे पौष कृ.१२,इ.स.१९३० रोजी झाली.

'कुलदैवत - भगवान प्रह्लादवरद लक्ष्मीनृसिंह,मेहकर

उपास्यदैवत - लक्ष्मीनृसिंह, दत्त,विठ्ठल

संप्रदाय- वारकरी संप्रदाय+दत्त संप्रदाय+नाथ संप्रदाय=हंस संप्रदाय

गुरू- आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराज, विश्रांती मठ,नाव्हा,जि.जालना

उत्तराधिकारी'- द्वितीय गुरूपीठाधीश वै.दत्तात्रय महाराज पितळे(१९३०-१९४०), तृतीय गुरूपीठाधीश वै.दिगंबर महाराज पितळे(१९४०-१९९५),चतुर्थगुरूपीठाधीश ॲड.रंगनाथ महाराज पितळे(विद्यमान)

दिंडी'-विदर्भातील पहिली मेहकर ते पंढरपूर, पैठण,मुक्ताईनगर, माहूर, घ्रुष्णेश्वर या दिंड्या प्रारंभ.

कार्य- अंधश्रद्धा निर्मूलन,जातिभेद निर्मूलन,समरसता,दिंड्या,ब्राह्मणेतरांच्या मौंजी,धर्मशुद्धी,गायत्रीमंत्र सर्वांसाठी खुला करणे,वारकरी संप्रदायात अष्टगंध बुक्का लावण्याचे प्रचलन,नामसप्ताह,चातुर्मास, यज्ञ,

प्रसिद्ध वचन- विश्वासोफलदायकः,ज्ञानमंदीराचा दगडही वाया जाणार नाही, यहा ज्ञानमंदीरमे नम्रताका सर ऊॅंचा है और सेवा यह महाव्रत है,तुम्ही तरूनी विश्व तारा,

संबंधित तीर्थक्षेत्रे -श्री क्षेत्र ज्ञानमंदिर मेहकर,विश्रांती मठ नाव्हा,श्वासानंद आश्रम वाराणसी, पंढरपूर, गायत्रीसिद्धपीठ,मुर्डेश्वर,विश्वासानंद संस्थान कांबी, टाकरवन,माहेरखेड

शिष्यसंख्या-अंदाजे १०लाख

प्रकाशने- श्वासानंद माऊली,दत्तबादशहा, माऊली सार,संप्रदाय संहिता, पादपद्म परागाष्टक,सच्चित सुख घनदेव,श्रीगुरू कल्पतरू सागर

संपर्क प्रा.डॉ. श्रीहरी रंगनाथराव पितळे, ज्ञानमंदीर, मु.पो.ता.मेहकर, जि.बुलढाणा. मो.८००७४६१६८६,९४२०१८२५६६,९४०४८६७३०४,९०११८५२९८८

वेबसाईट http://balabhaumaharajpitale.in/ Archived 2018-01-17 at the वेबॅक मशीन.

जन्म व बालपण

संत बाळाभाऊ महाराज पितळे उपाख्य ॐ ब्रम्ही श्वासानंद सरस्वती मेहकर हे वारकरी संप्रदायाचे एक संत होते. पितळे घराण्याच्या नऊ पिढ्यांच्या भगवान लक्ष्मीनृसिंहाच्या उपासनेचे फळ म्हणून १८८८ मध्ये पैनगंगा नदीच्या तीरी भगवान नृसिंहाने बाळाभाऊ महाराजाच्या मेहकर रूपाने अवतार घेतला, अशी कल्पना आहे.

गुरुदिक्षा

जालना जिल्ह्यातील नाव्हा गावात बाळाभाऊ पितळे यांना आनंदी आत्मानंद रंगनाथ महाराजांची गुरुदीक्षा मिळाली,

हंस संप्रदायाची स्थापना

गुरुदीक्षा मिळाल्यावर बाळाभाऊ महाराजांनी नाथसंप्रदाय दत्तसंप्रदाय मी वारकरी संप्रदाय यांचा त्रिवेणी संगम असणारा हंस संप्रदाय रूढ केला. विदर्भातून पहिली पायी दिंडी पंढरपूरला नेली. ४१ वर्षांच्या आयुष्यात त्यांनी शेकडो नामसप्ताह यज्ञ सोहळे आयोजित करून प्रत्येक चातुर्मासात पंडरपूरची पायी वारी करून सर्व जातिधर्माच्या लोकांना भक्तिमार्गात आणले. जातिभेद निर्मूलन धर्म शुद्धीकरण आणि समाज परिवर्तनासाठी महाराजांनी लक्षणीय कार्य केले. त्रैवर्णिक यांच्या मौंजीबंधनांचा समारंभ त्यांनी आयुष्यात दोनदा आयोजित केला.

चमत्कार

मृतास जीवदान, पुत्रहीनास पुत्रप्राप्ती, गरीब भाजीवालीच्या थैलीतून हजार रुपयांचे दान करणे, नदीतील पाण्याचे तूप करून पंक्तीस वाढणे, पाण्याचे दिवे लावणे, जिवंत वाघाची पूजा, माहूरच्या रेणुका मातेच्या मूर्तीस प्रसाद खाऊ घालणे, स्वतः कालकूट विष पचवणे यासारखे अनेक चमत्कार बाळाभाऊ महाराजांनी केले अशा आख्यायिका आहेत. त्यांच्याकडील मूक प्राणीसुद्धा एकादशीच्या दिवशी काही खात नव्हते, असे सांगितले जाते.

संजीवन समाधी

चारही आश्रमांचे पालन करून सन १९३०मध्ये काशी बनारस इथे महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही सगुण रूपात दर्शन दिले होते. बाळाभाऊ मार्गांच्या कृपाप्रसादाची अनुभती भक्तांना त्यानंतरही येत असते, असे म्हणतात. वैकुंठवासी दत्तात्रय महाराज आणि वैकुंठवासी समर्थ सदगुरू दिगंबर महाराज यांनी त्यांचा वारसा अखंड चालविला होता. विद्यमान हंस संप्रदायाच्य गुरुपीठाच्या गादीवर (२०१७ साली) ॲडव्होकेट रंगनाथ महाराज पितळे ऊर्फ बाबा साहेब आहेत.

पुन्हा दर्शन

चारही आश्रमांचे पालन करून १९३०मध्ये काशी इथे महाराजांनी संजीवन समाधी घेतल्यानंतरही सगुण रूपात दर्शन दिले होते, असे सांगतात.

ज्ञान मंदिर परिसर मेहकर

पितळे महाराजांची दिंडी

विदर्भातील ही पहिली दिंडी असून यात जवळपास शंभर वारकऱ्यांचा समावेश असतो. ही दिंडी आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपूर येथे पोहचते.

आषाढी वारी (पंढरपूर)

आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे जाणारी वारकरी पदयात्रा

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →